नवी दिल्ली : देशात करोनाचा कहर आता कमी होताना दिसत आहे. कारण दिवसेंदिवस रुग्णसंख्या घटत आहे. दरम्यान,सलग दुसऱ्या दिवशी करोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या खाली आल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात देशात 92 हजार 596 नवीन रुग्णांची भर पडली असून 2219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी एकाच दिवसात देशातील एक लाख 62 हजार 664 करोना रुग्ण बरे झाले आहेत, म्हणजे एकाच दिवसात 72,287 सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी भारतात 86,498 रुग्णांची भर पडली होती.
India reports 92,596 new #COVID19 cases, 1,62,664 discharges, and 2219 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry.
Total cases: 2,90,89,069
Total discharges: 2,75,04,126
Death toll: 3,53,528
Active cases: 12,31,415Total vaccination: 23,90,58,360 pic.twitter.com/m13IcoPRqe
— ANI (@ANI) June 9, 2021
देशात गेल्या 27 दिवसांपासून सलग करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. देशातील रिकव्हरी रेट हा 94 टक्के इतका आहे तर मृत्यू दर हा 1.21 टक्के इतका आहे. मंगळवारपर्यंत देशात 23 कोटी 90 लाख 58 हजार कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
राज्यात मंगळवारी गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी करोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. काल राज्यात 10 हजार 891 नवीन करोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात 16,577 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
राज्यात आजपर्यंत एकूण 55,80,925 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.3 टक्के एवढे झाले आहे. दरम्यान आज 295 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के इतका आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,69,07,181 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,52,891 (15.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11,53,147 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर 6,225 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,67,927 सक्रिय रुग्ण आहेत