कोल्हापूर – राज्यातील विधान परिषद च्या निकालानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजप वरती शरसंधान साधत चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते त्यावेळी त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
विधानपरिषद हा निकालात सुशिक्षित पदवीधर यांनी भाजपला नाकारण्याचा स्पष्ट होत असून चंद्रकांत पाटलांना ही चपराक आहे. चंद्रकांत पाटील यांना वाटतय सगळं जग आपल्या ताब्यात असलं पाहिजे मात्र दीड लाख मते भाजपच्या विरोधात गेली आहे अस सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
विधान परिषदेची ही निवडणूक 24 जिल्ह्याची होती म्हणजेच राज्यकेंद्रीत होती. भाजपच्या धोरणांच्या विरोधात नागरिक असल्याने वातावरण बदलले आहे. 2014 साली सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रात सत्ता मिळवली, त्यांनी जे पेरले होते तेच उगवले आहे.
लोकांनी त्यांच्या मागे फरपटत यावे अशी भाजपची धारणा होती मात्र मतदारांनी नाकारलं महाविकास आघाडीने चांगली मोट बांधत विधानपरिषदेत सुद्धा चांगले यश मिळवले आहे. अस मंत्री सतेज पाटील यानी म्हटलंय.