पुणे – राज्यातील बहुतांश जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे तेथील बाधित दर एक टक्क्याखाली आला आहे. मात्र, आजही सातारा, सांगली, पुणे आणि नगर हे जिल्हे करोना “हॉटस्पॉट’ आहेत. दरम्यान, धुळे आणि गोंदिया जिल्ह्यात सर्वांत कमी 0.1 टक्के बाधित दर आहे.
मुंबईसह 17 जिल्ह्यांमध्ये बाधित दर एक टक्क्यांच्या खाली आहे. तर पालघर, बुलढाणा, ठाणे, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील बाधित दर दोन टक्क्यांच्या आत तर नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, बीड जिल्ह्यातील बाधिक दर तीन टक्क्यांच्या आत आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 6.4 तर सांगली जिल्ह्यात 6.1 टक्के बाधित दर आहे. पुणे आणि नगर जिल्ह्यांतील बाधित दर 5.4 टक्के इतका आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील बाधित संख्या कमी होत नसल्यामुळे हा बाधित दर वाढलेला आहे. उस्मानाबाद, सोलापूर आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यात बाधित दर चार टक्क्यांखाली आहे.
सातारा, सांगली जिल्ह्यांत सर्वाधिक बाधित दर गोंदिया आणि धुळे जिल्ह्यांचा सर्वांत कमी बाधित दर