सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील करोनाबाधितांचा उद्रेक वाढतच असून मगंळवारी एकाच दिवसात 485 नवे रुग्ण आढळले आहेत. तर नऊ करोमनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार कनोमुळे नऊ जणांचा त्यू झाला. त्यामुळे करोनामुळे एकूण 333 जणांचा बळी गेला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात आज शनिवार पेठ सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, संगम माहुली येथील 55 वर्षीय पुरुष, पिरवाडी सातारा येथील 50 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, डिस्कळ ता. खटाव येथील 80 वर्षीय महिला तर जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये कुमठे ता. कोरेगाव येथील 86 वर्षीय पुरुष, परळी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, केसे ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, नांदगाव ता. कराड येथील 61 वर्षीय पुरुष अशा एकूण नऊ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
455 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 61, कोरेगाव 53, वाई 39, खंडाळा 30, रायगाव 30, मायणी 56, महाबळेश्वर 21, दहिवडी 11, खावली 19 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 127 अशा एकूण 455 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.