सातारा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागांमध्ये सातारा जिल्ह्यातील पर्यटक अडकले असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 02162-232175 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि. 22) केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत. या हल्ल्यामुळे देशाच्या विविध राज्यांमधील पर्यटक काश्मीर खोर्यातील विविध भागांमध्ये अडकले आहेत.
त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पर्यटक अडकले असल्यास, जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्या मोबाइल क्र. 9657521122 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर श्रीनगर येथे पुढीलप्रमाणे हेल्पलाइन्स स्थापन करण्यात आल्या आहेत. श्रीनगर येथील संपर्क क्रमांक – दूरध्वनी 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543, व्हॉटस्अॅप 7006058623, 7780805144, 7780938397.