सातारा – जिल्ह्यात करोनाचा कहर सुरुच असून, गुरुवारी (दि. 1) रात्री 12 वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार, 742 नागरिक नव्याने करोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.
गेल्या दोन-तीन दिवसांच्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवालांची संख्या दुपटीहून अधिक झाल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंधांची आणखी कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, सातारा तालुका सर्वांत मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. तालुक्यात एकूण 192 नवे बाधित आढळले असून, त्यात शहरातील 72 रुग्णांचा समावेश आहे. कोरेगाव तालुक्यानेही पॉझिटिव्ह अहवालांची शंभरी ओलांडली आहे.
सातारा शहरात सदबझार 15, गोडोली आठ, सैनिक स्कूल सात, शाहूपुरी सहा, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ प्रत्येकी पाच, करंजे चार, शनिवार पेठ, प्रतापगंज पेठ, शाहूनगर प्रत्येकी तीन, माची पेठ, केसरकर पेठ, मोळाचा ओढा प्रत्येकी दोन, यादोगोपाळ पेठ, रामाचा गोट, चिमणपुरा पेठ, मल्हार पेठ, बसाप्पा पेठ, कामाठीपुरा, बाबर कॉलनी, केसकर कॉलनी, गेंडामाळ, गडकर आळी प्रत्येकी एक, तालुक्यात वडुथ सात, खोजेवाडी सहा, चंदननगर, विकासनगर प्रत्येकी चार, नित्रळ, कोडोली, कोपर्डे, वाढे, खेड प्रत्येकी तीन, जिहे, आरे, साबळेवाडी, शेरी, काशिळ, नांदगाव, संभाजीनगर, कोंडवे प्रत्येकी दोन, धनगरवाडी, गजवडी, आकले, अहिरेवाडी, कुस बुद्रुक, अंबवडे बुद्रुक, परळी, धावडशी, राऊतवाडी, खोकडवाडी, निसराळे, पाडळी, गावडी, नागठाणे, स्वरूप कॉलनी, विकासनगर, क्षेत्रमाहुली, भरतगाववाडी, वर्णे, शिवथर प्रत्येकी एक, इतरत्र 43,
कराड शहरात बुधवार पेठ, शनिवार पेठ प्रत्येकी दोन, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, कार्वे नाका प्रत्येकी एक, इतरत्र सहा, तालुक्यात मलकापूर 15, शिवनगर सहा, हजारमाची, उंडाळे प्रत्येकी चार, कोळे, जुळेवाडी, काले प्रत्येकी तीन, तांबवे, गोंदी, येणके, सैदापूर, भोसलेवाडी प्रत्येकी दोन, ओगलेवाडी, कालेटेक, शेरे, कळंत्रेवाडी, जाळगेवाडी, पठारेवाडी, शिवाजीनगर, मालखेड, जखीणवाडी, उंब्रज, आगाशिवनगर, कोरेगाव प्रत्येकी एक,
पाटण तालुक्यात चोपदारवाडी चार, पाटण, तारळे, आचरेवाडी प्रत्येकी दोन, कुंभारगाव, मल्हारपेठ, धावडे, ठोमसे, दिवशी, त्रिपुडी, सावडे, सणबूर, तळमावले, ढेबेवाडी, मरळी प्रत्येकी एक, फलटण शहरात मलठण चार, गोळीबार मैदान तीन, लक्ष्मीनगर, पवार गल्ली प्रत्येकी दोन, मंगळवार पेठ, भडकमकरनगर, विद्यानगर, बुधवार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र दोन, तालुक्यात आसू चार, काळज, आदर्की, बिबी प्रत्येकी तीन, जाधववाडी, पाडेगाव प्रत्येकी दोन, मुंजवडी, मठाचीवाडी, हनमंतवाडी, तरडगाव, गिरवी, बिरदेवनगर, वाखरी, झिरपवाडी, कोळकी, मिरढे प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात चितळी दहा, पळशी नऊ, खटाव, अंबवडे, वडूज प्रत्येकी पाच, गोपूज चार, मायणी, रणसिंगवाडी प्रत्येकी तीन, बुध दोन, दरुज, कातरखटाव, पिंपळवाडी, पडळ, भांडेवाडी, पांगरखेल, डिस्कळ, पांढरवाडी, कान्हरवाडी, निढळ प्रत्येकी एक,
माण तालुक्यात म्हसवड दहा, विरळे चार, जाशी तीन, गोंदवले खुर्द, किरकसाल, मलवडी, वावरहिरे, भाटकी, पानवण, दहिवडी, टाकेवाडी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव 16, दुधानवाडी 15, तळिये, रहिमतपूर प्रत्येकी आठ, वाठार स्टेशन सात, किरोली पाच, खामकरवाडी, पिंपरी प्रत्येकी चार, सातारारोड, निगडी प्रत्येकी तीन, अरबवाडी, एकंबे, अपशिंगे, नलवडेवाडी, वाठार प्रत्येकी दोन, देऊर, त्रिपुटी, किन्हई, भुकरवाडी, भक्तवडी, पाडळी स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, विखळे, कण्हेरखेड, सोनके, साप, न्हावी, नांदवळ, नांदगिरी, अनपटवाडी, धामणेर, वाघळी, तासगाव, विखळे प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात लोणंद 12, शिरवळ 11, खंडाळा सात, आसवली सहा, मोर्वे, दापकेघर प्रत्येकी पाच, अहिरे, घाटदरे प्रत्येकी दोन, पारगाव, धावडवाडी, भोसलेवाडी, पाडेगाव फार्म, शेरेचीवाडी, शेखमिरवाडी, धनगरवाडी प्रत्येकी एक,
वाई शहरात मधली आळी चार, रविवार पेठ, गणपती आळी प्रत्येकी तीन, सोनजाईनगर, गंगापुरी प्रत्येकी दोन, रामडोह आळी, दत्तनगर, सिद्धनाथवाडी, बावधन नाका, धर्मपुरी, सोनगीरवाडी प्रत्येकी एक, इतरत्र चार, तालुक्यात भुईंज सहा, वेळे पाच, मालतपूर चार, पसरणी, बावधन प्रत्येकी तीन, धोम, गुळुंब, सुरुर प्रत्येकी दोन, कवठे, मालगाव, ओझर्डे, किकली, अनवडी, लोहारे, आसले, किकली, केंजळ प्रत्येकी एक, महाबळेश्वर शहर 33, तालुक्यात पाचगणी नऊ, क्षेत्र महाबळेश्वर तीन, काळमगाव, अवकाळी, दांडेघर, भेकवली, भिलार प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात कुडाळ, कुसुंबी, भुतेघर, बामणोली, मेढा प्रत्येकी दोन, रुईघर, काळोशी, बोंडारवाडी, प्रभूचीवाडी, मोहाट, सनपाने, आनेवाडी प्रत्येकी एक, इतर 30, इतर जिल्ह्यातील सांगली आठ, मुंबई, पुणे प्रत्येकी दोन, कोल्हापूर एक, असे एकूण 742 नागरिक बाधित झाले आहेत. सुदैवाने गेल्या 24 तासांत एकही करोनाबळी नसल्याने किंचित दिलासा मिळाला आहे. सक्रिय रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने जिल्ह्यात बेडस्ची संख्या अपुरी पडू शकते. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केली पाहिजे.