सातारा – करोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जारी असून लोकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी कर नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
साताऱ्यात ‘कोविड १९’चे दोन रुग्ण असले तरी त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत, लोकांनी घाबरु नये, मात्र काळजी घ्यावी लागली, असे आवाहन त्यांनी केले. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर कोणीही विनाकारण रस्त्यावर आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.