सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाचा कहर वाढतच आहे. रोज सरासरी सहाशे ते सातशेच्या दरम्याने नवीन रुग्ण आढळत असून करोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही चिंताजनक ठरू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने गुरूवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार 13 रुग्णांचा मृत्यू झाल आहे. तर आतापर्यंत करोनाच्या बळींची संख्या 443 वर पोहचली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात आवर्डे ता. पाटण येथील 52 वर्षीय महिला, खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोंडवे येथील 60 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर खंडाळा येथील 75 वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, चंचळी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 42 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव येथील 57 वर्षीय महिला, कटापूर ता. कोरेगाव येथील 57 वर्षीय पुरुष, उचिले ता. खटाव येथील 50 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये संभाजीनगर, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, राहोळी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, मलकापूर ता. कराड येथील 67 वर्षीय महिला अशा एकूण 13 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
870 जण करोनामुक्त; 682 नमुने तपासणीसाठी
जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 870 नागरिकांना दहा दिवसांनतर गुरूवारी घरी सोडण्यात आले. तर 682 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 11, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 13, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 54, कोरेगाव 37, वाई 56, खंडाळा 57, रायगाव 76, पानमळेवाडी 45, मायणी 27, महाबळेश्वर 50, दहिवडी 49, खावली 41 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 166 अशा एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.