स्वतःच्या कुटुंबापेक्षाही गावाला महत्त्व देणारे. करोना काळात गावाला अतिशय जीवापाड सांभाळलेल्या सरपंचांची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी असे मंचरनगरीचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांनी दिलेला लढा केवळ कौतुकालाच पात्र नव्हे; तर त्यांचे कार्य अद्वितीय आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. मंचरकरांच्या आरोग्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून गेली चार महिने करोनालढ्यात तन, मन, धन झोकून देऊन काम केले आहे. असा सरपंच लाभणे हे खरेतर मंचरकरांचे भाग्यच आहे. एक यशस्वी करोनायोद्धा म्हणून त्यांचे नाव येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या मुखी असेल, हे मात्र नक्की! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक करोनायोद्धा म्हणून लढत आहे. या लढ्यात त्यांना यश प्राप्त होवो, याच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना शुभेच्छा!
सारं जग क्षणात ठप्प केलेल्या करोना महामारीने गेल्या चार महिन्यांपासून भारतासारख्या देशातही थैमान घातले आहे. राज्यात पुणे शहरात 9 मार्चला करोनाचा पहिला रुग्ण आढळला राज्यातील बहुतांशी भाग करोनाने ग्रासला आहे. दिवसेंदिवस करोनाची भीती नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. हा संसर्गजन्य रोग जास्त पसरू नये म्हणून भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने सुरुवातीपासूनच ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली. जागतिक आपत्ती म्हणून संबोधले गेलेल्या या करोना युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2020 जनता जनता कर्फ्यूची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली. शासन, प्रशासन व सरकार यांनी जनतेला जनजागृती पर स्वतःला व आपल्या कुटुंबाला शक्य होईल तेवढे बंदिस्त करून कौटुंबिक काळजी घ्या, असे जाहीर आवाहन करीत आहे.
स्वतःला, कुटुंबाला क्वारंटाइन करून आत्मनिर्भर होऊन न घाबरता करोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा, असे सांगत आहे. या युद्धात सर्वच क्षेत्रातील सर्वच स्तरातील व्यक्ती या समाजासाठी आपले कर्तव्य म्हणून आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून आपल्या समाजाप्रती कर्तव्याला प्राधान्य देत आहे. “आपला मुलूख, आपली माणसं’ ह्या करोनासारख्या संसर्गजन्य महामारीच्या विळख्यात येऊ नयेत म्हणून अनेक योद्धे आजघडीला देखील देवदुतासारखे उभे आहेत. असेच एक कोविड योद्धे म्हणून आज ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो, ते मंचर नगरीचे विद्यमान सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांचा!
स्व. खासदार किसनरावजी बाणखेले यांच्यानंतर मंचरनगरीला एकमेव दुसरे तडफदार नेतृत्व म्हणून दत्ताभाऊ गांजाळे यांच्या नेतृत्वाची साथ मिळाली.
मातीशी नाळ जोडलेला या व्यक्तिमत्वाचे सारे जीवन “ऋण फेडू समाजाचे’ अशीच कार्यपद्धती. सामान्य माणसात राहूनही असामान्य कामगिरी करणारे कर्तृत्व व तसेच शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील त्यांचा शिष्य म्हणून दत्ताभाऊंची ओळख. जवळपास 50 हजारांच्यावर लोकसंख्या असलेल्या मंचर गावाला या करोना युद्धात अबाधित ठेवण्याचे कार्य दत्ताभाऊ यांनी केले. 14 मार्चला सर्वप्रथम मंचर शहरातील सर्व जिम आणि खासगी क्लासेस बंद करण्यात आले. 19 मार्चला संपूर्ण भारतात विमानतळ सोडले तर सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइड या निर्जंतुकीकरणाची फवारणी मंचर शहरात करण्यात आली. 20 मार्च या दिवसापासून मंचर शहरात देशात सर्वप्रथम लॉकडाऊन सुरू केले. शहरातील व्यापारीवर्ग दुकानदार यांच्याशी बातचीत करून करोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी दुकाने व्यवसाय बंद ठेवण्यासाठी विनंती केली, आणि व्यापाऱ्यांनीही साथ दिली.
गावकऱ्यांच्या सहकार्याने योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना, दुग्ध व्यावसायिकांना आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागू नये म्हणून भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच उपक्रम अर्थात “होम डिलिव्हरी’ हा उपक्रम मंचर पंचक्रोशीत भाऊंनी राज्यात प्रथमतः चालू केला. लॉकउाऊन उठला असला तरी गरजूंसाठी अद्यापही हा उपक्रम सुरूच आहे. दत्ताभाऊंच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत मंचरच्या वतीने चारशे लोकांना घरपोच सेवा देण्यासाठी पास देण्यात आले या सर्व लोकांचे नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले. हाकेच्या अंतरावर करोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता आपल्या नगरीत त्याचा शिरकाव होण्या अगोदरच दुसऱ्यांदा 29 मार्च 2020 या दिवशी दत्ताभाऊ यांनी सोडियम हायपोक्लोराइडचा डबल डोस करून पंचक्रोशीत फवारणी केली.
लॉकडाऊन संपण्याची शाश्वती नसल्याने गरीब गरजूंसाठी 4 एप्रिल रोजी शिवभोजन थाळीच्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. लॉकडाउन संपेपर्यंत शिवभोजनचे पैसे ग्रामस्थ, व भाऊंनी स्वतः भरले. मोफत शिवभोजन थाळी देणारे मंचर हे राज्यातील पहिले गाव असावे. 6 एप्रिल रोजी पोलीस, शासकीय कर्मचारी, डॉक्टर व आरोग्य सेवेचे कर्मचारी यांना यांना एका उद्योजक मित्राच्या माध्यमातून फेस शिल्ड वाटप करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी जागोजागी करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही संदेशात्मक चित्रे रस्त्यावर सुद्धा काढण्यात आले.
ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी 16 एप्रिल 2020 या दिवशी मंचर शहरात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वच घटकातील नागरिकांचे इन्फ्रारेड थर्मामीटरने शारीरिक तापमान आठवड्यातून एकदा घेण्यास सुरुवात केली. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने 19 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घरातच रहा.. सुरक्षित रहा! या संदेशाची रांगोळी रेखाटण्यात आली. शहरात येणारे 36 पैकी 30 रस्ते बंद करण्यात आले. भविष्यकाळात येणारा करोनाचा संभाव्य धोका लक्षात घेत असता जनजागृतीपर उचललेले हे पाऊल दत्ताभाऊंनी कठोर निर्णयाने उचलले.
मंचर पंचक्रोशीत कुठलाही गरजू व्यक्ती अन्नपाण्याविना उपाशी राहू नये तसेच त्याला कोविड-19 च्या विरोधात लढण्यासाठी, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी परिपूर्ण आहार मिळावा या करिता माता-भगिनींना रोजच्या स्वयंपाकात एका व्यक्तीचे जेवण जास्त बनवावे. ते जेवण पॅकिंग करून घराशेजारील गरजू व्यक्तींना द्यावे किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ताब्यात द्यावे जेणेकरून गरजूपर्यंत ते पोचवता येईल असे आवाहन केले. या उपक्रमाला अनेक माता भगिनींनी पुढाकार घेतला व गरजूंना सकस आहार मिळाला.
परप्रांतीय मजुरांचे तांडेच्या तांडे आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असताना कोणी पायी, तर कोणी सायकल मोटारसायकलचा वापर करत मूळगावी जात होते. त्यामुळे मंचर रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी, लोकांना सुखरूप आपल्या गावी जाण्यासाठी अशा लोकांना व रात्रीच्या वेळी चेक पोस्टवर उभ्या असणाऱ्या पोलिस बांधवांना शिवसेना उपनेते शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच दत्ताभाऊंनी स्वतःच्या पैशातून रिफ्लेक्टिव जॅकेट व बॅटरीचे वाटप करण्यात आले. हे काम आजही निरंतर चालू आहे.
14 मे या दिवशी मंचर नगरीतील लोकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीक “आर्सेनिक अल्बम 30′ या गोळ्यांचे 50 ते 60 हजार नागरिकांना मोफत वितरण करण्यासाठी स्वतः भाऊंनी पुढाकार घेतला. त्यासाठी लागणारा खर्चाचा भार अशा शासकीय निधीतून न करता स्वखर्चातून करत आहेत. या रोगप्रतिकारकशक्तीच्या गोळ्या संपूर्ण गावाला वाटप करणारे व गोळ्या सेवन करणारे मंचर हे राज्यातील नव्हे तर देशातील पहिले गाव ठरले आहे. मंचरमधील नागरिकांचा सर्वे करून त्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे त्रास असणारे रुग्ण कॅन्सर व किडनी विकाराचे रुग्ण यांची वेगळी यादी करून त्यांचे ुूेर्श्रिीी ाशींशीच्या साह्याने रक्तातील ीिे2 चे प्रमाण चेक करण्यास आरोग्य विभागाच्या मदतीने सुरुवात करण्यात आली आहे. ज्या रुग्णांचे रक्तातील ीिे2 म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण 90 पेक्षा खाली आहे, अशा रुग्णांना कोविड-19ची बाधा लवकर होऊ शकते, असे तज्ञांचे मत आहे. त्यासाठी अशा लोकांचा सर्वे करून, त्यांना घराबाहेर पडू नये अशी विनंती करण्यात येत आहे.
या सेवेच्या ठायी तत्पर असणाऱ्या राजा माणसाच्या कार्याला आपणा सर्वांकडून त्रिवार मानाचा मुजरा!!! असेच बळ आपणास आणि दत्ताभाऊंना करोनाशी लढण्यासाठी मिळो.
ना थके कभी पैर,
ना कभी हिम्मत हारी है
जज्बा है परिवर्तन का िंज़दगी में,
इसलिये सफर जारी है!
वाचकहो, प्रत्येक गावात जर ही अशी दत्ताभाऊंसारखी कर्तव्य तत्पर माणसे निर्माण झाली तर करोनाच काय दुसऱ्या कुठल्याही संकटाला आपण जगाच्या नकाशातून कायमचे हद्दपार करू यात तीळमात्र शंका नाही!
घरात रहा.. सुरक्षित रहा…
प्रशासनाला सहकार्य करा. !
मु.पो.ग्रामपंचायत
आजघडीलाही रविवारच्या दिवशी सर्व व्यवहार बंद राहतात त्यामुळे प्रशासनावरील सर्व ताण कमी होतो. या दिवशी पोलीस बांधवांना देखील आराम मिळतो. त्या दिवशी कोणीही घराबाहेर येत नाही. याच करोनाच्या पार्श्वभूमीवर सरपंच या नात्याने गावातील प्रत्येक भागात दत्ताभाऊंनी जातीने लक्ष घातले. या दिवसांत सर्व लोक घरात सेल्फ क्वारंटाइन व्हावे म्हणून आवाहन केले. रस्त्यावर येऊन करोना विषयी जनजागृती करण्याचे काम दत्ताभाऊ करत आहेत. यात आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला कुठलीली हानी पोहचू नये व गावासाठी जास्त वेळ देता यावा या उद्देशाने दत्ताभाऊ मंचर ग्रामपंचायत कार्यालयात 25 मार्च या दिवशी स्वतः मुक्कामी राहावयास आले. चार महिन्यांहून अधिक काळ दत्ताभाऊंचा मुक्काम हा ग्रामपंचायत कार्यालयातच आहे.
रविवारी जनता कर्फ्यू
29 मार्चपासून दर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केल्याने प्रशासन, पोलीस व अत्यावश्यक सुविधा यांच्यावरील ताण कमी झाला. या काळात शहरात हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उपजीविकेसाठी साडेआठशे रुपयाचे दहा दिवस पुरेल असे स्वयंपूर्ण किराणा व तरकारी भाजीपाल्याचे किट वाटप करून जनतेने दत्ताभाऊंच्या मदत कार्यास हातभार लावला. या कार्याला परदेशात स्थायिक मंचरकरांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला.
ग्रामपंचायतीकडून अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सोय…
करोनाच्या महामारीवर मंचरकरांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आपल्या दोन तालुक्यात नसलेली सर्व लाईफ सपोर्टसहित व व्हेंटिलेटर असलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका घेण्यासाठी 20 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऍम्बुलन्स आपल्या सेवेत दाखल होईल जेणेकरून आंबेगाव, जुन्नरमधील अत्यवस्थ रुग्णांसाठी याचा फायदा होणार आहे. या रुग्णवाहिकेत उपचारासाठी डॉक्टर हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या असतील. यासाठी ज्यांचे मार्गदर्शन लाभले असे जल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, मंचर ग्रामपंचायतचे उपसरपंच व सर्व सदस्य, नागरिकांच्या पाठींब्यामुळे हे शक्य झालेले आहे. अशी अत्याधुनिक रुग्णवाहिका घेणारी ग्रामपंचायत मंचर ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलीच ग्रामपंचायत असेल.
मंचरकरांसाठी आवाहन…
मंचर शहराची लोकसंख्या 50 ते 60 हजार गृहीत धरली तरी 7 ते 8 हजार नागरिक धोकादायक गटात येतात. आपल्या तालुक्यात एकावेळी जास्तीत जास्त 100-150 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. याहून एकावेळी जास्त झाले तर आपण, आपले प्रियजन कुठे असू? तुमच्यामुळे तुमची लहान लहान मुलं, पत्नी, वृद्ध आई वडील करोना केअर सेंटरवर पोहोचली आहेत, त्यांची काळजी तुम्हाला लागली आहे. मंचरवासीयांनो, हे सगळं करोनापेक्षा भयावह आहे. गरज असेल तरच बाहेर पडा.
दत्ताभाऊंचे रिपोर्ट निगेटिव्ह
दत्ता गांजाळे कोविड योद्धा म्हणून काम करीत असताना त्यांनाही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी करोना चाचणी करून घेतली. त्यांचे दोन्ही कोविड-19 टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. हा आनंद असला तरी मंचर शहरातील रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या चिंतेत टाकणारी आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपनेते शिवाजीदादांच्या प्रेरणेने लढण्याचे बळ मंचर शहरात राबविलेल्या उपाययोजना व त्याचा सकारात्मक परिणाम याची दखल माध्यमांनी घेतल्यानंतर भाऊंच्या या कार्याची दखल स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतली. सरपंच दत्ताभाऊ यांना स्वतः फोन करून त्यांच्या सर्व कार्याचे अभिनंदनपर कौतुक केले व येणाऱ्या काळात कोविड-19च्या युद्धात कोविड योद्धा होऊन असेच लढण्याचे बळ मिळो हेही बोलले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेला हा कॉल राज्यातील फक्त मंचरच्या सरपंचांना दत्ताभाऊ यांनाच केला याचा मंचरकरांना सार्थ अभिमान आहे. याबद्दल दत्ताभाऊ सांगतात की, आमचे पक्षप्रमुख असलेले मुख्यमंत्री संपूर्ण राज्याची जबाबदारी अतिशय यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात राज्यातील करोनास्थिती ओटोक्यात आहे. प्रत्येक बारिकसारिक गोष्टींवर लक्ष देताना एखाद्या गावच्या सरपंचांना फोन करून तेथील परिस्थितीची माहिती करून घेणे कौतुकास्पद आहे.
पक्षाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे करोनाकाळात संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरतात. अख्खा मतदारसंघ आपले कुटुंब मानून अडचण कोणतीही असो त्यांनी ती सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. अन्नधान्याचे किट वाटप असो वा भैरवनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून सॅनिटायझर, पीपीई किट व इतर आरोग्य साधनांचे वाटप यात दादांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. उद्धवसाहेब आणि दादा यांची प्रेरणाच मंचरकरांच्या आरोग्यासाठी लढण्याचे बळ देते.
माझा गाव हे माझे कुटुंब आहे. कुटुंब प्रमुख या नात्याने गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी हे माझे कर्तव्य आहे. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, माणसासारखे जगता आले पाहिजे आणि दुसऱ्यांनाही जगवता आले पाहिजे. या मातीसाठी देशासाठी अनेक महापुरुषांनी आपले रक्त सांडले आहे. आपल्याला त्यांचा वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील कित्येक संकटे स्वराज्यात आली, प्रजेवर आली. महाराजांनी त्या संकटावर मात केली त्यापासून पळ कधीच काढला नाही. आपण त्याच छत्रपतींचे वैचारिक वारस आहोत. आपणही या करोनासारख्या संकटावर मात करणारच!