अकोला – राज्यात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा फटका विदर्भालासुद्धा बसला आहे. अकोला शहरात जोरदार पाऊस झाला असून शहरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तसेच अनेक प्रकारे नुकसान झाले आहे. दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांनी या नुकसान ग्रस्त भागाची आज पाहणी केली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/851255518814078
अकोला मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती सोबतच घरांचीही पडझड व नुकसान झाले आहे.आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी पूरपरिस्थितीची पाहणी केली व तात्काळ मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
अकोल्यातील पुर्णा व मोर्णा नदीच्या संगमामुळे पाणी बॉल्क झाले त्यामुळे ते पाणी शहरात आले असे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले आहे. भविष्यात अशी परिस्थिती येणार नाही यासाठी मोर्णा नदीचे खोलीकरण करुन भविष्यातील धोका टाळता येणार असून या सर्व परिसराचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन नदी-नाल्यामंध्ये पाणी कसे जाते हे बघीतले जाणार असून उपाययोजना केली जाणार आहे.
नुकसानग्रस्त लोकांना येत्या दोन दिवसांत ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहिर केले आहे. तसेच पुर्णत: ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना १ लाख रुपये मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मोर्णा नदीचे खोलीकरण करुन भविष्यातील धोका टाळता येणार. तसेच नागरीकांनी पंचनामा होताना पंचनामा योग्य होत आहे का याबाबत माहीती घ्यावी..तसेच अकोला मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती सोबतच घरांचीही पडझड व नुकसान झाले आहे.आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी पूरपरिस्थितीची पाहणी केली व तात्काळ मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. असेही बच्चू कडून यांनी माहिती देताना सांगितले आहे.