पुणे – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन झाले आहे. या पालखी सोहळ्यात अनेक सामाजिक संघटनादेखील सहभागी होत विविध संदेश देत प्रबोधनाचे काम करित आहेत.
पुण्यातील जाणीव सामाजिक संस्था आणि सलाम मुंबई फाउंडेशन देखील या सोहळ्यात सहभागी झाले असून युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश याव्दारे दिला जात आहे. गेली सहा वर्षापासून हा उपक्रम या संस्थेव्दारे राबविला जात असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.