मुंबई – वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटासोबत युती केल्यानंतर प्रकाश आंबेडकर वारंवार काँग्रेस आणि राष्ट्र्वादीबाबत वक्तव्य करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर टीका केली त्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा देखील आंबेडकरांनी समाचार घेतला होता. प्रकाश आंबेडकरांनी राऊत हे माझ्या पक्षाचे नाहीत असं म्हणत राऊतांना देखील टोला लगावला होता. त्यावर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांवर अशी विधान करणं आम्हाला मान्य नसल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.
शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत. ते भाजपचे आहेत असं म्हणणं त्यांच्या कारकिर्दीवर मोठा आरोप आहे असं स्पष्ट मत राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.जर ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी भाजपचं सरकार दूर ठेवून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार येऊच दिल नसत. पवारांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला असही राऊत यावेळी म्हणाले.
देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम शरद पवार करू शकतात. म्हणूनच विरोधकांच्या एकीचा विषय निघतो तेव्हा शरद पवारांचेच नाव येते असंही राऊत यावेळी म्हणाले. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका घेताना प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरवे असं सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.
वंचितने उद्धव ठाकरेंसोबत केलेल्या युतीमुळे राजकरण चांगलेच तबल्याचे पाहायला मिळाले. या युतीमुळे राज्यात एक नवीन समीकरण पाहायला मिळणार आहे. याची दखल सत्ताधारी भाजपने घेत या युतीवर भाष्य देखील केले होते. आता निवणूक लागल्यानंतर याचा नेमका फायदा कोणाला कितीदा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.