मुबई – कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. सीमावादावाचे पडसाद दोन्हही राज्यातील वाहनांवर निघत असल्याचे कालपासून पाहायला मिळत आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘ऊठ मराठ्या ऊठ’ अशी साद घालत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा सढळ आहे.
दिल्लीचया पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते पुढे म्हणतात,महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय.बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ ! अस राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
दिल्लीचया पाठिंब्या शिवाय
बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाहीं.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.महाराष्ट्राचा
कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय.बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.ऊठ मराठ्या ऊठ!— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022
आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे.महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता.तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले.स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.हा षंढ पणा आहे. अशी टीका राऊत यांनी ट्विटद्वारे केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली.
क्रांती दिसत आहे.महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता.तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले . स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.हा षंढ पणा आहे— Sanjay Raut (@rautsanjay61) December 7, 2022