मुंबई –नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात संतापाचे वातावरण देशभरात निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ सत्ताधारी पक्षाकडून मोर्चा काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोदी सरकार आणि भाजपाला अप्रत्यक्षपणे खोचक टीका केली आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 22, 2019
संजय राऊत यांनी ट्विट राहत इंदोरी यांच्या कवितेतील ओवी ट्विट केले आहे की,’सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में. किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है.’
दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. त्यामुळे या तीन देशांमधून भारतात आलेल्या मुस्लिमेतर समुदायांना (हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध, ख्रिश्चन) भारताचं नागरिकत्व मिळू शकेल. हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करणार असल्यानं तो संविधानविरोधी असल्याचा आक्षेप काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी नोंदवला आहे.