कल्याण: संजय राऊत यांनी 12 आमदारांची चिंता करू नये, त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी, असा टोला विधानसेभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यापेक्षा त्यांनी कोविड पेशंटला उपचार मिळत नाहीत, त्यांचे काय होणार? यासंबंधी प्रश्न विचारला असता तर मला जास्त बरं वाटलं असतं, हा विषय डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस हे आज कल्याण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांना लक्ष्य केले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा घेतला. कल्याण येथील होली क्रॉस हॉस्पिटलला भेट देत कोविड उपचारासंबंधी माहिती घेतली.
कोरोनाच्या टेस्ट अपुऱ्या आहेत. लोकांना व्हेंटिलेटर्स मिळत नाही. उपनगराचा दौरा संपल्यावर सर्व अहवाल तयार करुन मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. यावेळी बैठकीला महापालिका आयुक्त, अधिकारी, भाजपचे आमदार तसेच प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.