मुंबई – शिवसेनचे बंडखोर आमदार आणि महाविकास आघाडीतील मतभेद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी सरकारमधून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या सरकारचं भवितव्य आता अंधारात आहे. मात्र त्याआधी बंडखोर आमदार आपली बाजू सुरक्षित करण्याचं काम करत आहे. तसेच शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तरही देत आहेत.
शिवसेनेकडून संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदारांवर टीका करत आहेत. त्याला बंडखोर गटातील दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी ट्विट करून म्हटलं की, संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गळ्यातलं ताईत आहेत. ते शिवसेना संपवायला निघालेत, असं केसरकर यांनी पत्रात नमूद केलंय.
सध्या शिंदे गट आणि शिवसेना एकमेकांना शह देण्यात व्यस्त आहेत. ठाकरे सरकारने बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेतली आहे. तर शिंदेंकडून पाठिंबा काढत असल्याचं पत्र राज्यपालांना पाठविण्यात आलं आहे. त्यामुळे या संपूर्ण गोंधळाचा शेवट काय होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.