मुंबई – चिंचवड आणि कसाब विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या दोन्हही ठिकाणी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडी मात्र अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. सत्ताधाऱ्यांकडून सध्या या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळते. यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः अनेक महत्वाच्या नेत्यांना फोन करून या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. असं असली तरी ठाकरे गट मात्र या निवडणुकांसाठी आग्रही असल्याचे समजते. संजय राऊत यांनी ठाकरे गटाची भूमिका मांडत याबाबत सूचक विधान केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील सर्व विरोधकांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणुकीची आठवण करून देत महाविकास आघाडीने ही निवडणूक बिनविरोधात करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करताहेत. अशात खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत भाष्य केले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणाराच आहोत असा सूतोवाच राऊत यांनी यावेळी केला आहे.
“मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेलं हे आव्हान चांगलं आहे. परंतु राज्यात घाणेरडं सुडाचं राजकारण कोणी सुरु केलं ? येथील वातवरण गढूळ कोणी केलं ? यावरही विचार व्हायला हवा असं राऊत यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून एकत्र निर्णय घेऊ,दोन्हही मतदारसंघामध्ये सरकारला वातावरण अनुकूल नाही. जनतेच्या मनात काय आहे हे विधानपरिषदेमध्ये स्पष्ट झाले आहे असं राऊत यावेळी म्हणाले.
आम्ही सर्व्हे केलाय दोन्ही मतदारसंघातील निकाल वेगळा लागू शकतो. असा एक जनमानस आम्हाला स्पष्ट दिसतोय. म्हणून या निवडणुका होतील. लोकांची इच्छा आहे. आम्हाला आमच्या भूमिका लोकांना स्पष्ट करायच्या आहेत, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.