Sanjay Raut on deepak kesarkar । सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतरराज्यातील राजकारण पूर्णपणे तापल्याचे दिसून येत आहे. आता याच मुद्द्यावरुन शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी बोलताना, ‘दीपक केसरकर यांना बुटाने मारले पाहिजे. केसरकर हे अफजलनाखानाची औलाद आहेत. असे म्हटले.
आज सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना संजयराऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेविषयी संताप व्यक्त केला. यावरुन त्यांनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली. शिवाजी महाराजांचा पुतळा अशाप्रकारे कोसळणं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. फक्त निषेध करून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची फाईल बंद करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.असा आरोप त्यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्या पुत्राचं यामध्ये कनेक्शन Sanjay Raut on deepak kesarkar ।
या पुतळ्यामागे ठाणे कनेक्शन आहे. एकनाथ शिंदे यांच्या पुत्राचं यामध्ये कनेक्शन आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्त्वाखाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे. तसेच शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सुरु झालेले आंदोलन संपणार नाही. मी 30 तारखेला तिकडे स्वत: जाणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
केसरकर आणि नारायण राणेंवर संजय राऊतांची टीका Sanjay Raut on deepak kesarkar ।
नारायण राणे या माणसाला वेड लागले आहे. इमारती कोसळणे आणि पुतळा कोसळणे यामध्ये फरक आहे. राणे तुम्ही मराठी खासदार असून, असं बोलताय. शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाला आहे. हा आरोप नाही तर हे सत्य आहे. देवेंद्र फडणवीस ही तुमची पापं आहेत. तुमच्या भाजपच्या लोकांमुळेच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात पराभव झाला, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यामधून काही चांगलं होईल, असे दीपक केसरकरांना वाटते. हे शब्द केसरकरांच्या तोंडातून कसे निघू शकतात. केसरकर हे अफजलनाखानाची औलाद आहेत. असली सडक्या विचाराची माणसं आमच्यातून निघून गेली, हे बरंच झालं, असे संजय राऊत यांनी म्हटले. किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेत. हे सगळे शिवाजी महाराजांचे का इतके शत्रू झालेत, हे माहिती नाही. हे देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे. मिंधे यांची टोळी पोसण्याचं काम फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी केले. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पडला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.