मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिष्टमंडळासह आज दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली. दरम्यान सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोठे खिळे तसेच शेकडो बॅरिकेट्सही लावले आहेत. यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, तुम्ही अन्नदात्याला दहशतवादी म्हणता. पण तुमची वर्तणूक दहशतवाद्यांच्या वरची आहे, असा निशाणा त्यांनी मोदी सरकारवर साधला आहे. तसेच, आम्ही राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली आहे. आमचे शिवसेनेचे सर्व खासदार या ठिकाणी आले. त्यांना जो संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला आहे. आम्ही पूर्ण ताकदीनीशी शेतकऱ्यांसोबत उभे आहोत. सरकारने त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे. चर्चेत कोणतेही राजकारण येऊ देऊ नये, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.
We spoke to Tikait sahib, gave our message & expressed solidarity. Govt should speak to farmers in a proper way. Ego would not help run the country: Shiv Sena MP Sanjay Raut at Ghazipur border pic.twitter.com/8pbPSH39js
— ANI (@ANI) February 2, 2021
दरम्यान, शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. तसेच खिळे सीमेवर ठोकले असते, तर चीननं घुसखोरी केली नसती, असा टोला संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला होता.