मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून कारावासात आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांच्यावर मुंबईतील पत्राचाळीत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी अटकेची कारवाई केली होती. राऊत यांच्याविरोधात ईडी कारवाई सुरु झाल्यापासूनच हिरे कारवाई केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राजकीय सूडबुद्धी पोटी करण्यात येत असल्याचा आरोप राइट यांनी केला होता. अशातच आता संजय राऊत यांनी त्यांच्या आई सविता राऊत यांना एक पत्र लिहलं आहे. हे पत्र ८ ऑक्टोबरला लिहण्यात आलं असून ते राऊत यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट करण्यात आलंय. या पत्राद्वारे संजय राऊत यांनी, आई सविता राऊत यांना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळवलंय. ( sanjay raut letter )
एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी शिंदे गटात जात असल्याचं पाहायला मिळतंय. संजय राऊत यांनी मात्र या पत्राद्वारे आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचा निश्चय आई सविता राऊत यांना कळवला आहे. याबाबत भाष्य करताना संजय राऊत यांनी, उद्धव ठाकरे हे आपले जिवाभावाचे मित्र व सेनापती असल्याचा उल्लेख केला आहे.
संजय राऊत लिहतात, “शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. महाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात ‘संजय’ कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’ वगैरेच्या भयाने बरेच आमदार खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे,”
संजय राऊत यांच्या पत्रात छगन भुजबळांचा कायर म्हणून उल्लेख; ६ महत्वपूर्ण मुद्दे… | sanjay raut letter
“माझ्यावर बनावट व खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी ‘गन पॉइंट वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकऱ्यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?” असं संजय राऊत यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे. ( sanjay raut letter )