मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून या आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत. आत्तापर्यंत अनके लोकांची चौकशी पोलिसांनी केली आहे.
दरम्यान, आता या प्रकरणाला एक राजकीय वळण मिळाले असून यामध्ये मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येऊ लागल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊतही या मैदानात उतरले आहेत. राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते. यावर सुशांतचे काका आर.सी.सिंह यांनी संजय राऊत खोटे बोलत आहेत, असं म्हंटल आहे.
सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते असा दावा राऊत यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील रोखठोक सदरातून केला. ‘सुशांतसिंग राजपूत याचे कुटुंब म्हणजे त्याचे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे चांगले संबंध नव्हते. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले न्हवते. असा आरोप राऊत यांनी केला होता.
यावर सुशांतचे काका म्हणजेच, आर.सी.सिंह यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाला कि, सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. संजय राऊत चुकीचे बोलत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत यांनी चुकीचं विधान केलं आहे. या चुकीच्या माहितीमुळे आमची प्रतिमा खराब होत आहे. एखाद्याची प्रतिमा खराब करणे चांगली गोष्ट आहे का? बिहारमधील प्रत्येकाला माहित आहे की सुशांतसिंह याच्या वडिलांनी केवळ एकच विवाह केलेला आहे. असं सुशांतचे काका म्हणाले.
संजय राऊत यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रामध्ये सुशांत सिंह राजपूतवर अनेक आरोप केले आहे. तसेच, राऊत यांनी या आत्महत्याप्रकरणी विरोधकांवर निशाणा साधत अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.