मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर देशात नव्याने लागू करण्यात आलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. तब्बल वर्षभरापासून सुरु असणाऱ्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. या निर्णयावरून पत्रकारांशी बोलतांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला लगावला.
ते म्हणाले,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही. असं म्हणत राऊतांनी कंगना राणावत वर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी, पद्मश्री पुरस्कारप्राप्त अभिनेत्री कंगना राणावत यांनी देशाच्या स्वातंत्र्यांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेध व्यक्त केला जात आहे. कंगना राणावतने एका मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह वक्तव्य करून देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्वांचा अपमान केला. 1947 साली देशाला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले आहे, असे वक्तव्य केले होते.