कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ३० जागांसाठी मतदान होणार असून यामध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला. होता तर आज पत्रकारांशी बोलतांना शिवेसना खासदार संजय राऊत यांनी देशातील चार राज्यांच्या निवडणुका या राजकारणाच्या भविष्याची दिशा ठरवणार असल्याचा दावा केला आहे.
ते पुढे म्हणाले,’पश्चिम बंगालमध्ये भाजपाने संपूर्ण ताकद जरी उतरवली असली तरी ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल हे चित्र स्पष्ट दिसत आहे. भारत नेहमीच लोकशाहीवर हल्ले होत आले आहेत, याविरोधात जनता, विरोधी पक्ष लढले आहेत, म्हणूनच लोकशाही जिवंत आहे.ममता बॅनर्जी यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं असून आम्ही त्यावर विचार करु. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी हे या देशातील मोठे नेते आहेत, सर्वांनाच पत्र आलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोहीम सुरु केली आहे आणि याबाबत सर्वांना विचार करावा लागेल. असं म्हणत संजय राऊत यांनी दीदींचं निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, भाजपविरोधात एकवटण्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडलेल्या भूमिकेला जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाठिंबा दर्शवला आहे. विरोधी पक्षांनी एकजूट करण्याची आवश्यकता असल्याचे मेहबुबा यांनी म्हटले आहे.
ममतांनी पाठवलेल्या पत्राबाबत मेहबुबा यांनी त्यांचे ट्विटरवरून आभार मानले. ममता यांनी मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे.