मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले आहे. 100 कोटी लसींच्या डोसचा टप्पा देशात पार केला गेला असून मोदी यांनी 100 कोटी लसीचे डोस हे केवळ आकडे नाहीत. हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे.
इतिहासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे अशा शब्दात कौतुक केले आहे. यावेळी ऐकीकडे मोदींचं भाषण सुरु असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊतांनी 100 कोटी डोस खरोखर पूर्ण झाले आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले की, 100 कोटी डोस खरोखर पूर्ण झाले आहेत का? झाले असतील तर आनंदच आहे. डोस देण्याच्या बाबतीत आपला देश जगात 19 व्या स्थानी आहे. काहीजणं म्हणत आहेत. 33 कोटीच दोन डोस झालेत. तर काहींना दुसरा डोस मिळालाच नाही. अशी शंका राऊत यांनी आज उपस्थित केली आहे.
एखाद्या गोष्टीचा उत्सव करायचा म्हटलं, सेलिब्रेशन करायचं म्हटलं तर या देशात नवा पायंडा पडलाय. तर आपण मोदींच्या या उत्सवात शामील होऊयात. हा एक इव्हेंट सुरु आहे. पण खरोखरच 100 कोटी डोस झाले असेल तर ती गौरवाची बाब आहे. असेही राऊत म्हणाले आहेत.