शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल ईडी समोर हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी राज्यात सत्तांतराच्या घडामोडी सुरु असताना राऊत यांना ईडीने नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने राऊत यांनी काल ईडी कार्यालयात हजेरी लावली.
खासदार संजय राऊत यांची तब्बल दहा तास ईडीने चौकशी केली. रात्री पावणे दहाच्या सुमारास राऊत ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर कथित पत्राचाळ प्रकरण प्रकाशात आले होते. यामुळे राऊत यांनी देखील आपण तपास यंत्रणांना सहकार्य करणार असल्याची भूमिका घेतली होती.
संजय राऊत यांनी मला पत्रा चाळ कुठेय माहित नाही असं उत्तर ईडीला दिलं. त्यावर ईडीने मग गैरव्यवहार कसा झाला असा प्रतिसवाल केला होता. परंतू संजय राऊतांनी आपण तपास यंत्रणेला सहकार्य केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मनात काही शंका असल्यास केंद्रीय यंत्रणांसमोर जाणे हे आपले कर्तव्य आहे. आमची 10 तास चौकशी झाली आणि आम्ही पूर्ण सहकार्य केल्याचे राऊत म्हणाले.
Maharashtra | It is our duty to go in front of the central agencies if they have any doubt in their minds so that people do not have any doubt in their minds about us. We were questioned for 10 hours and we gave full co-operation: Shiv Sena MP Sanjay Raut, in Mumbai pic.twitter.com/8tbQn0aNZL
— ANI (@ANI) July 1, 2022
पत्राचाळ प्रकरण आहे तरी काय ?
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. ही चाळ विकसित करण्याचे काम प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. परंतु त्यांनी या चाळीचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.