अभिनेता संजय दत्त सध्या ‘शमशेरा’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात संजूने निगेटिव्ह भूमिका साकारली असून त्याच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. असं असलं तरी संजू सध्या त्याच्या गर्लफ्रेंड पटवण्याच्या ट्रिकच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.चर्चा आणि संजय हे जणू समीकरणच बनलेल आहे.
संजू चित्रपटातून संजयला नेमक्या किती गर्लफ्रेंड होत्या हे सर्वांना समजलं परंतु मुलींना इमोशनली इम्प्रेस करण्यासाठी संजय सुरुवातीला अनेक वेग वेगळ्या ट्रिक वापरायचा. संजयच्या याच आयडियाची सध्या जोरदार चर्चा आहे. संजूच्या या आयडियाचा भांडाफोड स्वतः डिरेक्टर राजकुमार हिराणीने केला होता.
संजय दत्तचे एक-दोन नव्हे तर 308 मुलींशी संबंध असल्याचेही सर्वांना माहिती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की तो या मुलींना भावनिकरित्या जवळ आणण्यासाठी खोटे नाटक करत असे. हे खोटे त्याच्या आई नर्गिसच्या कबरीशी संबंधित आहे. संजय त्याच्या मैत्रिणींना भावनिकरित्या अडकवण्यासाठी काय ट्रिक वापरायचा चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांनी ‘संजू’च्या प्रमोशनदरम्यान हे गुपित उघड केले होते.
हिरानी यांनी सांगितले की संजय मुलीला डेट केल्यानंतर लगेचच तिला कबरीस्थानात घेऊन जायचा, जिथे तो त्याच्या आईच्या ‘बनावट’ कबरीवर रडायचा. नंतर तो म्हणायचा, ‘मी तुला माझ्या आईला भेटायला घेऊन आलो आहे.’या भेटीनंतर मुलगी संजूशी इमोशनल होऊन जोडली जायची. वस्तुस्थिती अशी होती की ती कबर त्याच्या आईची नसायची.इमोशन भावनेतून मुलगी मात्र संजूच्या जवळ यायची.