Sangli Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराची लाट कायम असतानाच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत (Sangli Politics) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ला मोठा धक्का बसला आहे. महापालिकेचे दोन नगरसेवक युवराज शिवाजीराव गायकवाड आणि सुरेश लक्ष्मण बंडगर यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे (Sangli Politics) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या दोन्ही नगरसेवकांनी भाजपा पक्षाची सदस्यता घेतली. यावेळी सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, सुमित कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटलांना मोठा धक्का काही महिन्यांपूर्वी झालेल्या सांगली महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे केवळ ३ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील दोन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेत (Sangli Politics) भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘करेक्ट’ राजकीय डाव खेळला होता. त्याची परतफेड म्हणून महापालिका निवडणुकीनंतर भाजपाने राष्ट्रवादी शरद पवार गटात खिंडार पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. Sangli Politics रवींद्र चव्हाण यांची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना लिहिले की, “सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नगरसेवक सुरेश लक्ष्मण बंडगर आणि युवराज शिवाजीराव गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.” चव्हाण यांनी नव्या सदस्यांचे भाजपा परिवारात हार्दिक स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 🪷 भाजपा पक्ष प्रवेश सोहळा, सांगली मिरज कुपवाड 🪷 📌 पक्ष प्रवेश करणारे मान्यवर – सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे नगरसेवक सुरेश लक्ष्मण बंडगर आणि नगरसेवक युवराज शिवाजीराव गायकवाड आदी. 📌 उपस्थित मान्यवर – मंत्री चंद्रकांत दादा पाटील,… pic.twitter.com/6zBXLTnGgO — Ravindra Chavan (@RaviDadaChavan) May 19, 2026 २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात पक्षांतराची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतरही अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी सत्ताधारी पक्षाकडे वळताना दिसत आहेत. सांगलीतील हा पक्षप्रवेश हा या सिलसिल्यातला एक महत्त्वाचा घटक मानला जात आहे. या घडामोडीमुळे सांगली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जयंत पाटील व शरद पवार गटासाठी हा धक्का कितपत परवडणारा ठरतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.