संगमनेर: तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या निमज गावातील ग्रामपंचायतचा निकाल लागला असून गावकरी विकास मंडळाचा दारुण पराभव करत शेतकरी विकास मंडळाने 11–00 करत घवघवीत यश मिळवले. शेतकरी संघाचे चेअरमन संपत डोंगरे यांनी तरुण पिढीला उमेदवारी देऊन यंदाच्या निवडणुकीत युवा पिढीची कमाल पाहायला मिळाली.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाने 11 जागा मिळवत एकहाती सत्ता हस्तगत केली आहे. गावकऱ्यांचे वार्ड एक आणि दोन मध्ये विषेश लक्ष लागून होते. येथे अतिशय चुरस पहायला मिळाली. यामध्ये वार्ड नं एक मध्ये अलका गिऱ्हे यांना 477, अरुण गुंजाळ यांना 451, तर विमल कासार यांना 458, मते पडून विजयी झाले आहेत. वार्ड नंबर दोन मध्ये सागर डोंगरे हे 459, साहेबराव मतकर हे 369 तर ताराबाई कासार यांना 409 मते मिळाली आहे. वार्ड नं 3 मधून दिलीप बिबवे यांना 318, कविता डोंगरे यांना 335 मते मिळाली आहेत. तर वार्ड नं 4 मध्ये हरिकीसन जगदाळे यांना 392, वंदना लष्करे यांना 441 तर सुरेखा बिबवे यांना 412 मते पडून निवडून आले आहेत.
शेतकरी विकास मंडळाचे नेते संपत डोंगरे, गंगाधर डोंगरे, विलास कासार, बाळासाहेब कासार, तुकाराम गुंजाळ, रामनाथ डोंगरे, विजय गुंजाळ, बाबाराजे मतकर, गणपत डोंगरे, आदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाचे सर्व युवा कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.
आज तालुक्यातील मांडवे, बिरेवाडी आणि निमज ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला आहे.
यात निमज गावातील ग्रामपंचायतचा निकाल प्रतिष्ठितेचा होता. गावकरी विकास मंडळाकडे गेल्या दहा वर्षांपासून सत्ता असतानाही त्यांना गावातील एकही सदस्य निवडून आणता आला नाही. तसेच माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाने गावातील संपूर्ण पॅनल निवडून आणत तालुक्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात शेतकी संघाचे अध्यक्ष संपत डोंगरे तसेच रामहरी कातोरे यांचे अभिनंदन होत आहे.