मुंबई – समृद्धी महामार्गामुळे राज्यात क्रांतिकारी बदल घडणार आहेत. या महामार्गामुळे 14 जिल्ह्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. नागपूर आता “जेएनपीटी’शी 10 तासात जोडले जात आहे. आता हा महामार्ग सेमीफास्ट रेल्वे आणि कार्गो रेल्वेनेही जोडला जाणार असून या महामार्गामुळे डेटा सेंटर इको सिस्टीम आता उर्वरित राज्यातही उभी राहणार आहे. 10 हजार गावांमध्ये ऍग्री बिझनेस सोसायटी उभारण्यात येणार असून शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय कर्नाटकातील हिंसाचार घडणे अशक्य”, संजय राऊत आक्रमक!
मुंबईतील जियो कन्व्हेन्शन सेंटर येथे अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे अपेक्स कॉन्क्लेव्ह झाले. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राजदूत एलिझाबेथ जोन्स, संजय कौल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य उद्योगस्नेही राज्य असून उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. महाराष्ट्र हे अमेरिकन उद्योगांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे. या पुढील काळातही राज्याला उद्योग क्षेत्रात अधिक आघाडीवर ठेवण्यात अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य मोलाची भुमिका बजावेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
“दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय कर्नाटकातील हिंसाचार घडणे अशक्य”, संजय राऊत आक्रमक!
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. गती शक्ती योजनेमुळे मोठे बदल घडणार असून याव्दारे उद्योग क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसमुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य आता नाविन्यतेची, स्टार्ट अप्स व युनिकॉर्नची राजधानी बनली आहे. पायाभूत सुविधा, नावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ असणारे मॉडेल सर्वसमावेशक असल्याने राज्यातील पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.