मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत. मलिक यांनी आज समीर यांच्यासंदर्भात ट्विट करत खळबजनक खुलासे केले आहेत. त्यावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला राष्ट्रपतींकडून वर्दी मिळाली; ते काढणे कोणाच्याही हातात नाही अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली आहे.
अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. क्रुज ड्रग्ज प्रकरणात आर्यण खानला अटक झाल्यानंतर वानखेडे यांचे लोक कौतुक करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यासह काही लोक त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. समीर वानखेडे यांची नोकरी वर्षभरात जाणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले आहे. त्यानंतर वानखेडे यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे मलिक म्हणाले आहे.
समीर वानखेडे यांनी त्याच्यांवर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. मला राष्ट्रपतींकडून वर्दी मिळाली; ते काढणे कोणाच्याही हातात नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ड्रग्ज हा सर्वात जास्त आर्थिक फायदा करून देणारा अवैद्य व्यापर आहे. हवाई, जहाज, रेल्वे आणि रस्त्याने हा ड्रग्ज देशात येतो. याला आळा घालण्याची जबाबदारी ही अमदी पदार्थ नियंत्रण विभागाची आहे. आम्ही ते थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. असे एका हिंदी वाहनीला बोलताना वानखेडे यांनी सांगितले आहे.