मुंबई – मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुदत संपल्याने त्यांची एनसीबीतून बदली करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकाळ संपल्यानंतर समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरएस कस्टम आणि सेंट्रल एक्साईज असं केडर असलेले वानखेडे पुन्हा आपल्या खात्याच्या सेवेत रुजु होतील.
एनसीबीमध्ये कार्यरत असताना वानखेडे यांच्यावर अनेक आरोप झाले. तसेच साक्षीदारांनी देखील वानखेडे यांच्यावर कोऱ्या कागदांवर स्वाक्षऱ्या घेतल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी नोकरीसाठी दिलेलं जातीचं प्रमाणपत्र देखील अवैध असल्याचे आरोप झाले होते.