नवी दिल्ली – पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारडून एक नवीन योजना लागू करण्यात आली आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती केंद्र सरकारच्या दोन पेन्शनचा लाभ घेऊ शकणार आहे. पेन्शन विभागाकडून ’75 मुख्य नियम संबंधित पेन्शन’ नावाची सीरिज या संदर्भात सुरू करण्यात आली आहे.
सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन हे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या देशात आज कोट्यवधी केंद्र सरकारी पेन्शनधारक आहेत. केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेचा लाभ आता कुटुंबातील कोणतीही एक व्यक्ती घेऊ शकणार आहे. त्यासाठी एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती केंद्रीय कर्मचारी असणे गरजेचे आहे.
पेन्शन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील आणि त्यापैकी एकाचा सेवेदरम्यान किंवा सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाला, तर कुटुंबातील पेन्शनचा लाभ जिवंत असलेल्या दोघांपैकी कोणाला तरी दिला जाऊ शकतो. पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला पेन्शन मिळेल. तसेच पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीला मिळेल. यापैकी दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांच्या मुलाला पेन्शनचा लाभ दिला जाईल.
विधवा व घटस्फोटित मुलीलासुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी पालक जिवंत असताना पतीकडून घटस्फोट झालेला असण्याची अट ठेवण्यात आली आहे. जर सरकारी कर्मचाऱ्याची आश्रित मुलगी घटस्फोटित असेल, तर घटस्फोटाचे प्रकरण स्पर्धात्मक न्यायालयात चालू असेल तरच कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळेल. कर्मचारी किंवा पेन्शनर्सच्या आयुष्यात हे प्रकरण सुरु असणे गरजेचे आहे. मात्र मृत्यूनंतरही घटस्फोट मिळाला असेल, तर हा नियम लागू होतो. या परिस्थितीत घटस्फोटाच्या दिवसापासून कौटुंबिक पेन्शन जोडली जाते.
याचबरोबर मुलगी अविवाहित असेल तर जोपर्यंत ती नोकरी करत नाही तोपर्यंत तिला पेन्शनचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. अविवाहित मुलीला लग्न होईपर्यंत कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळू शकतो. मुलगी विधवा किंवा घटस्फोटित असेल तर पुनर्विवाहापर्यंत कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेता येईल.