मुंबई – महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती उत्सुक होते. संभाजीराजेंनी ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र यासाठी सर्वपक्षांनी मिळून आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले होते. दरम्यान त्यांना उमेदवारीही द्यायची नाही त्यांना विरोधही करायचा नाही, अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतल्याचे दिसून आले. शिवसेनेनेकडून पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवण्यात आली होती. ते संभाजीराने यांना मान्य नव्हते अखेर शिवसेनेने कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली. त्यानंतर आज संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची मोठी घोषणा केली आहे.
संभाजीराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली त्यावेळी ते म्हणाले, शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिला. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान आहे. असा मोठा निर्णय संभाजीराजे यांनी घेतला आहे.
संभाजीराजे पुढे म्हणाले, सर्वप्रथम सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. इतकं प्रेम माझ्यावर त्यांनी केलं हे मी कदापी विसरु शकत नाही. माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील राजकीय दिशा कशी असणार याबाबत 12 मे रोजी पुण्यात दोन निर्णय जाहीर घेतले. त्यानुसार राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार. मला सर्व गणितं माहिती आहेत. पुढील प्रवास किती खडतर आहे. मला सर्व पहायचं होतं. सर्व अनुभवायचं होतं. गेली 15 ते 20 वर्षे नवीन राजवाडा सोडून मी कम करत आहे. राज्यभर फिरतोय. प्रामाणिकपणे भूमिका मांडत होतो. सर्वपक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेवर पाठवावं असं वाटत होतं.
ज्या आमदारांनी फॉर्मवर सह्या केल्या त्या सर्वांचे आभार मानतो. त्या आमदारांच्या आयुष्यभर मी पाठीशी राहील. केव्हाही त्यांनी हाक द्यावी संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेत असणार. शिवसेनेने मला ऑफर दिली आणि पक्षात प्रवेश करण्याची खासदारकी मिळवा. मी घेऊ शकलो असतो पण मी जाहीर केलं होतं की, मी जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत. राजे.. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची. पण घोडे बाजार होणार… घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाहीये. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. असेही ते म्हणाले.
मी सर्व पक्षांना विनंती केली होती की, माझी कार्यपद्धती पाहून आपण सर्वांनी मला मदत करावी. माझी अजिबात कुणावरही नाराजी नाहीये. मी आता मोकळा झालोय स्वराज्य संघटीत करण्यासाठी. मला कोणत्याही पक्षाचा द्वेष नाही. मी सुद्धा छत्रपतींचा मावळा आहे. माझी ताकद 42 आमदार नाहीत तर जनता आहे. आता स्वराज्य संघटना मजबूत करणार आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाटी सज्ज आहे. सर्व अपक्ष आमदारांनी मला फोन केला आणि म्हटलं, राजे आम्ही तुमच्यासोबत आहोत पण आमच्यावर दबाव आहे असेही संभाजीराजे म्हणाले आहेत.