मुंबई – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटना गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करत आहेत. मुख्यतः पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडला असून केंद्राने हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतानाच आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून ( samana editorial today ) देशातील विरोधीपक्ष आपली भूमिका बजावण्यात कमी पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘मरतुकड्या’ विरोधकांमुळेच केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारवर हवा तसा दबाव पडत नाही. काँग्रेस सरकारवर तुटून पाडण्यात कमी पडली अशी भूमिका देखील अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. सामानाच्या अग्रलेखातून ( samana editorial today ) काँग्रेस कमी पडत असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता भाजप नेते राम कदम यांनी, “सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?” असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसला चांगलंच डिवचलंय.
काय म्हणाले राम कदम?
सामानाच्या अग्रलेखाबाबत प्रतिक्रिया देताना कदम यांनी, “आजच्या सामनाच्या अग्रलेखात ( samana editorial today ) देशातील विरोधी पक्षावर टीका करण्यात आली आहे. सध्याचा घडीला विरोधी पक्षातील नेते कमकुवत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर विखुरलेले आहेत. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.”
“दुसरीकडे मात्र, देशभरात केवळ राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांचे नेते शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत. केवळ शरद पवार सक्रिय आहेत आणि बाकीचे नेते निष्क्रिय झाले असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?” असा खोचक प्रश्न उपस्थित केलाय.
शिवसेना आज का सामना….
कब तक #कॉंग्रेस के नेता @RahulGandhi #शिवसेना द्वारा अपमान सहेगी ??
.— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) December 26, 2020