सलमान आणि कतरिनाचा “भारत’ पुढच्या महिन्यात 5 जूनला रिलीज होणार आहे. जो रोल कतरिना करते आहे, तो रोल पूर्वी प्रियांका चोप्राला दिला गेला होता. मात्र काही वैयक्तिक कारणामुळे तिने हा सिनेमा सोडला होता. “भारत’मध्ये सलमानबरोबर प्रियांका असणार आहे, अशी घोषणा झाल्यापासून केवळ 11 तासातच तिने हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी “लाईव्ह ट्विटर’सेशनमधील एका इंटरव्ह्यूदरम्यान स्वतः सलमानने ही गोष्ट सांगितली. प्रियांकाने “भारत’ सोडल्याचे दुःख त्याला झाले आणि अजूनही तो “पीसी’वर नाराज आहे.
सलमानच्या या इंटरव्ह्यूला कतरिना आणि डायरेक्टर अली. सिनेमात कतरिना साकारत असलेल्या कुमुद् वर्मचे कॅरेक्टर भ्यास्ण्यासाठी कतरिनाने काय केले, असे विचारले असता. त्या प्रश्नाचे उतर स्वतः कतरिनानेच दिले. सिनेमाच्या शुटिंगला केवळ दोनच महिने राहिलेले होते. लुक आणि हेअर स्टाईल सगळे काही या दोनच महिन्यात करायचे होते. असे ती म्हणाली. पण तेवढ्यात सलमानने हस्तक्षेप करून प्रियांका जास्त वेळ देऊ शकली असती, असे सांगितले. त्याच्या मनातून काही केल्या प्रियांकाबाबतचा राग जायला तयार नाही.