नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे.आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे, तसेच त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले आहे.
मात्र, हा दौरा रद्द करण्यामागे भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचाही हात असल्याचे मानले जात असून, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी सातत्याने करत आहे. यावरून सध्या राजकारण चांगलेच पेटले असतांना बृजभूषण सिंह यांच्यानंतर आता भाजपचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनीही राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली.
नाशिक येथे साक्षी महाराज यांनी पत्रकरांशी बोलतांना या मुद्यावर आपल मत मांडल आहे. ते म्हणाले,’विरोध करणारे, विरोध करत असून स्वागत करणारे, स्वागत करत आहेत. मात्र राज ठाकरे यांनी त्यांचा उत्तर भारतीयांबाबतच्या विधानावरून उत्तर भारतीय लोकांचे मन दुखावले आहे. आपल्या देशातील प्रत्येक भारतीयाला सगळ्यांना सगळ्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे.’ ते पुढे म्हणाले,’ अयोध्यावासियांची एवढीच अपेक्षा आहे की, राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि दर्शनाला यावं. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेलं वक्तव्य चुकीचंच आहे. मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीयांबाबत तुम्ही कसं बोलू शकता? असा सवाल राज ठाकरेंना साक्षी महाराज यांनी केला आहे.