प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 – देशाच्या सिमेवर सैनिक लढत असतात, म्हणून आपण सुखरूप राहू शकतो. एखाद्या मंदिरात जावून आपण परमेश्वराचे दर्शन घेतो. तसेच सैनिकांना राखी पाठविणे हेदेखील पवित्र कार्य आहे. सैनिकांची आठवण आपल्याला संकटकाळी होते. आज महिलादेखील सैन्यात दाखल होऊन देशासाठी लढत आहेत, हेदेखील मोठे काम आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केले.
सैनिक मित्र परिवारतर्फे आणि कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या सहकार्याने बुधवार पेठेतील मंदिराच्या सभामंडपात सैनिकांना पाठवण्यात येणाऱ्या 21 हजार राखीपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी निवृत्त मेजर आशा शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री वीणा फडके, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा कांबळे, वनिता वागस्कर, विश्वेश्वर बॅंकेच्या व्यवस्थापक राखी कोकाटे, संपदा सहकारी बॅंकेच्या संचालक प्रा. संगीता मावळे, लोकमान्य सोसायटीच्या शाखा व्यवस्थापक गायत्री चौगुले, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. प्रताप परदेशी, ऍड. शिवराज कदम जहागीरदार, महेंद्र पिसाळ, ऍड. रजनी उकरंडे, युवराज गाडवे, राजू बलकवडे, अक्षय हलवाई, आनंद सराफ, कल्याणी सराफ आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते राखीपूजन झाले.
उज्वला सावंत, आरती भिसे, राजू बलकवडे, सारंग सराफ आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले. लायन्स आणि रोटरी क्लबच्या अनेक शाखासह, पुण्यातील 50 हून अधिक सामाजिक संस्था, संघटनांनी या उपक्रमात सहभाग घेत राख्या दिल्या आहेत. गिरीश पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. परदेशी यांनी प्रास्ताविक केले. बलकवडे यांनी आभार मानले.