नेपाळ : तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डीत विजेतेपदासाठी यजमान नेपाळ विरूध्द भारत असा सामना रंगणार आहे. अंतिम सामना हा आज (सोमवारी) दुपारी १ वाजता सुरू होणार आहे.
तत्पूर्वी, भारतीय महिलांनी शेवटच्या सामन्यात यजमान नेपाळला ४३-१९ अशी धूळ चारत साखळीत अपराजित रहात अव्वल स्थान पटकावले. भारताकडून पुष्पा कुमारी, निशा, साक्षी आणि दिपीका यांनी उत्कृष्ट खेळ करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
आता अंतिम सामन्यातही भारत-नेपाळ आमने सामने असणार आहेत, त्यामुळे साखळीतील शेवटचा सामना हा अंतिम सामन्याची रंगीत तालीम होती.