कांठमाडूळ : तेराव्या दक्षिण आशियाई स्पर्धेत पुरूष बॅडमिंटनपटूनी आजही कामगिरीत सातत्य राखले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सिरील वर्मा आणि आर्यमन टंडन यांनी उपांत्य फेरीतील सामने जिंकत पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे स्पर्धेत भारताची आणखी दोन पदके निश्चित झाली आहेत.
सिरील वर्माने उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेच्या के दिुनका करूणारत्ने याचा २१-०९, २१-१२ असा पराभव केला तर दुसरीकडे आर्यमन टंडन याने नेपाळच्या रतनजीत तमांगचा २१-१८, १४-२१, २१-१८ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान, पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिरिल वर्माने पाकिस्तानच्या मुराद अलीवर २१-१२, २१-१७ असा तर आर्यमन टंडन याने श्रीलंकेच्या रंथुश्का करूणाथिलकेवर २१-१७, २१-१७ असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.