लुधियाना : पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक हातावर पोट असणारे कामगार रोजगाराच्या कमी संधी असलेल्या राज्यांमधून रोजगाराची उपलब्धता असणाऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर करीत असल्याचे आपण पाहत असतो. आपला प्रदेश, घरदार, कुटुंब मागे सोडून चार पैसे कमावता यावे यासाठी आलेले हे मजूर पडेल ते काम करत असतात. देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे मात्र आपलं राज्य सोडून पोटापाण्यासाठी इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झालेले मजूर मात्र निवडणुकांच्या या धामधुमीपासून फार दूर आहेत.
एएनआय या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने या कामगारांशी संवाद साधला असता या मजुरांनी आपल्याला देखील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्याची इच्छा आहे मात्र रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात आल्यानं ते शक्य नाही अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. आपल्याला देखील आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सरकारने काहीतरी करायला हवं अशी मागणी देखील या मजुरांनी यावेळी बोलताना केली.
Punjab: Migrant laborers in Ludhiana say they won’t be able to cast vote in #LokSabhaElections2019 as they're away from home for work.A laborer from Bihar working in Ludhiana says,“We request govt to make arrangements so that we can cast our vote from where we're living for work" pic.twitter.com/jcg1aEVYQg
— ANI (@ANI) April 7, 2019