नवी दिल्ली – कुटुंब नियोजनामुळेच हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं सांगत त्यांनी कुटुंब नियोजन करु नका असा सल्ला दिल्यामुळे पुन्हा एकदा भाजप पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग यांनी नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमध्ये छोला दसरा मैदानात विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासिंह यांनी कुटुंब नियोजनामुळं देशात हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे.
त्या पुढे म्हणाल्या, ‘हिंदुंनी आपल्या मुलांचं संरक्षण करावं. देवाने तोंड दिलं आहे तर तो घासही देईल. आपण सावध झालो नाही तर आता जे धन कमवत आहात त्याचा उपयोग करण्यासाठी तुमच्या मुलांकडे काही नसेल. त्यामुळे तुमच्या मुलांना राष्ट्रवाद शिकवा. कुटुंब नियोजनामुळेच हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचं सांगत त्यांनी कुटुंब नियोजन करु नका असा सल्ला आहे.
दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.