मेलबर्न – महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरी गाठलेल्या भारतीय संघाला आता विश्ववितेजेपद केवळ एक पाऊल लांब आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत जागतिक विजेते बनून इतिहास घडविण्याची संधी भारतीय महिला संघाला मिळालेली आहे.
भारतीय महिला संघाला आजी-माजी खेळाडूसह देशभरातून अनेक भारतीय चाहते विजेतेपदासाठी शुभेच्छा देत आहेत. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेडुंलकर याने देखील भारतीय संघास शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताच्या महिला संघाने पूर्ण सकारात्मकतेने या सामन्यात सहभागी व्हावे. कोणतेही दडपण न घेता आपल्या खेळावर लक्ष द्यावे व ही स्पर्धा प्रथमच जिंकण्याची स्वप्नवत कामगिरी करावी. केवळ एका खेळाडूवर अवलंबून न राहता सांघिक खेळ करून विश्वविजेतेपद मिळवावे, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताच्या महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.