सिडनी : जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढावी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र कार्यक्रम अधिक सोयीचा व सूकर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचा एक दिवस कमी करत चार दिवसांचा सामना करण्याचा विचार सुरू आहे.या प्रस्तावास जगभरातील आजी माजी क्रिकेटपटूंनी विरोध दर्शविला आहे. त्यात आता सचिनेही या प्रस्तावास नापंसती दर्शवली आहे.
” कसोटी सामना चार दिवसांचा करणे मला फारसे रूचलेले नाही. पाचव्या दिवशी फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळते, त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीचा सामना करण्याचे फलंदाजांसमोर आव्हान असते. सामना चार दिवसांचा केला तर त्यातील सगळी रंगतच निघून जाईल.” असे मत भारतरत्न सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
"There is T20, there is one-dayers and then there are T10 and 100-ball cricket. Test is the purest form of cricket. It should not be tinkered with." – Sachin Tendulkar on four-day Test cricket. pic.twitter.com/dlAFlmkQzL
— Wisden (@WisdenCricket) January 6, 2020
पुढे बोलताना सचिन म्हणाला, ” क्रिकेटच्या दृष्टीने आणि कसोटीचा चाहता म्हणून मला असे वाटते की कसोटी क्रिकेट पाच दिवसांवरून चार दिवसांवर आणू नये. गेली अनेक वर्षे कसोटी क्रिकेट ज्याप्रमाणे खेळले जाते आहे, तसेच खेळले जावे. आयसीसीने पांरपारिक कसोटी क्रिकेटच्या ढाच्याला बदलू नये.” असे देखील सचिन म्हणाला.
दरम्यान, सचिनच्या आधी माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर तसेच सध्याचा भारताचा कर्णधार विराट कोहली, नॅथन लायन यांनी देखील आयसीसीच्या या प्रस्तावाला विरोध केला आहे.