“शक्ती अस्तित्व के एहसास की’ या सिरीयलमधून रुबीना बाहेर पडणार आहे. तीन वर्षांपासून या सिरीयलमधील नाट्यमय कथानकाने प्रेक्षकांना बांधून ठेवले होते. मात्र आता रुबीना दिलाइक हिने ही सिरीयल सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचा समजते आहे. यापूर्वी व्हिव्हीयन दसेनानेही ही सीरियल सोडली आहे. रुबीनाने सिरीयल सोडल्यावर कथानकात काय बदल करायचा, याचा विचार निर्मात्यांकडून केला जात आहे. तिच्या जागेवर नवीन कलाकार घेण्याची शक्यता फारच कमी आहे.