मुंबई -बॅंकामार्फत मोठी रक्कम पाठविण्यासाठी दिली जात असलेली आरटीजीएस सेवा शनिवारी रात्रीपासून 14 तास बंद राहणार आहे. या सेवेत तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ही सेवा बंद करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
तांत्रिक सुधारणानंतर या सेवेतील काही त्रुटी कमी होतील. मात्र दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्याची व्यवस्था असलेली नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे एनईएफटी ही सेवा सुरू राहणार आहे.
आरटीजीएस सेवा शनिवारपासून 14 तास बंद राहणार असल्याची माहिती बॅंकांनी आपल्या ग्राहकांना द्यावी, त्यामुळे त्यांना रक्कम पाठविण्यासाठी इतर व्यवस्था करता येईल, असे रिझर्व्ह बॅंकेने इतर बॅंकाना सांगितले आहे. आरटीजीएस सेवा डिसेंबर 2020 पासून अहोरात्र सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारची सेवा जगात फक्त काही देशातच उपलब्ध आहे. भारत सरकारने डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. यासाठी रिझर्व्ह बॅंक आणि व्यावसायिक बॅंका वित्तीय तंत्रज्ञान वाढवित आहेत.