नासाच्या म्हणण्यानुसार 2030 पर्यंत जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी बरीच वाढलेली असेल. त्याच वेळी चंद्र आपल्या स्थानावरून ढळल्यामुळे समुद्राला वारंवार भीषण भरती येईल आणि ती इतकी प्रचंड असेल, की त्यामुळे सतत पूर येऊन समुद्रकिनाऱ्यांलगत हाहाकार उडेल. हे पूर वर्षातून एक-दोन वेळा नव्हे तर प्रत्येक महिन्यात येतील. कारण जेव्हा चंद्राच्या कक्षेत अगदी किंचितसा बदल होईल, त्यावेळी येणारा पूर अत्यंत नुकसानदायक असेल.
निसर्गाच्या दणक्याने संपूर्ण जगाला सध्या हादरवून टाकले आहे. कुठे भीषण पूर आला आहे तर कुठे उष्णतेची लाट. केवळ भारतातच नव्हे तर जर्मनीसारख्या विकसित देशातही भयंकर पूर आलेला आहे. तेथील शास्त्रज्ञांच्या मते, एक हजार वर्षांच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा पूर आहे. दुसरीकडे अमेरिकेतील 12 राज्ये जंगलात लागलेल्या आगींनी होरपळत आहेत.
“महाशक्ती’ म्हणून ओळखला जाणारा हा देश पूर्ण ताकद पणाला लावूनसुद्धा ही आग विझविण्यात यशस्वी ठरलेला नाही. महाराष्ट्रातील महापुरापासून जगाच्या विविध देशांमधील या भीषण संकटांपर्यंत अनेक ठिकाणी हाहाकार उडालेला असतानाच “नासा’ या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेने घाबरवून सोडणारी एक बातमी जगाला दिली आहे.
सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि अन्य ग्रहांच्या हालचालींबाबत नासाकडून सुरू असलेल्या एका संशोधनातून ही माहिती उजेडात आली आहे आणि ती भीतीत भर टाकणारी आहे. नासाने असा दावा केला आहे की, सौरमंडलात असे काही बदल होणार आहेत, की त्यामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडेल. हे नुकसान साधेसुधे नसेल तर पृथ्वीच्या अस्तित्वालाच त्यामुळे धोका उत्पन्न होईल. निसर्गाच्या या तांडवामुळे संपूर्ण जग समुद्राच्या पाण्यात बुडून जाऊ शकते. मुख्य म्हणजे हे संकट शे-दोनशे वर्षांनंतर नव्हे तर अवघ्या नऊ वर्षांनी येणार आहे, असे नासाचे म्हणणे आहे.
सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह एका निश्चित गतीने आपापल्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतो. परंतु त्यापैकी एखाद्याने जर आपला वेग बदलला किंवा एखादा ग्रह अथवा उपग्रह आपले निश्चित स्थान सोडून अन्यत्र भरकटला तर काय होईल? नासाने अशाच काही प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत.
नासाच्या अभ्यासानुसार, 2030 मध्ये समुद्राला येणाऱ्या महाभरतीमुळे येणारा पूर अत्यंत विनाशकारी असेल. या घटनेचे कारण असेल चंद्राचे आपल्या स्थानावरून ढळणे. पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 50 हजार किलोमीटर दूर असणारा चंद्र आजपासून अवघ्या नऊ वर्षांनी समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशात प्रचंड उलथापालथ घडवून आणणार आहे, असा इशाराच नासाने दिला आहे.
नासाच्या म्हणण्यानुसार 2030 पर्यंत जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी बरीच वाढलेली असेल. त्याच वेळी चंद्र आपल्या स्थानावरून ढळल्यामुळे समुद्राला वारंवार भीषण भरती येईल आणि ती इतकी प्रचंड असेल, की त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांलगत हाहाकार उडेल.
जलवायू परिवर्तनाशी संबंधित “नेचर’ या नियतकालिकात नासाचा हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. जर नासाची ही भविष्यवाणी खरी ठरली तर समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशांमध्ये येणारा पूर वर्षातून एकदा किंवा दोनदा नव्हे तर दरमहा येईल आणि तोही पहिल्यापेक्षा कितीतरी नुकसानदायक असेल. कारण ज्या-ज्यावेळी चंद्राच्या कक्षेत अगदी छोटासा बदल होईल, त्या-त्यावेळी मोठ्या भरतीमुळे येणारे पूर प्रचंड असतील.
चंद्राच्या हालचालींमुळे पृथ्वीवर येणारे पूर अत्यंत उपद्रवी असतील असे मानले गेले आहे. ज्यावेळी दररोज समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या तुलनेत त्या दोन फूट अधिक उंच उसळू लागतात, तेव्हा अशा प्रकारचे पूर समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशांत येतात. समुद्रातील या उंचच उंच लाटांमुळे घरे आणि रस्ते पाण्याखाली जातात आणि दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होतात. जागतिक तापमानवाढ आणि चंद्राच्या हालचालींमध्ये होणारे बदल अशा प्रकारचे संकट पृथ्वीवर घेऊन येणार आहेत.
चंद्र दर 18.6 वर्षांनी आपल्या जागेत किंचितसा बदल करतो. या संपूर्ण कालावधीपैकी अर्धा काळ तो पृथ्वीच्या लहरी दाबून टाकतो. परंतु अर्धा काळ पृथ्वीवरील लहरी अधिक तीव्र करतो. त्यांची उंची वाढवतो आणि हेच प्रचंड धोकादायक असते. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असला तरी चंद्राच्या प्रत्येक हालचालीचा पृथ्वीवर परिणाम होतो. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर बराच परिणाम घडवून आणते. त्यामुळे पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या गतीवरही परिणाम होतो.
दुसरीकडे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा चंद्राच्या कक्षेवरही परिणाम होतो. परंतु नऊ वर्षांनंतर म्हणजे 2030 मध्ये चंद्र आपल्या जागेपासून ढळणार असल्यामुळे पृथ्वीवर आणखी मोठा परिणाम होईल. भरतीच्या वेळी समुद्रात उसळणाऱ्या लाटांची उंची तीन ते चार पटींनी अधिक असेल. नासाने असा इशारा दिला आहे की, न्यूसेन्स फ्लड म्हणजे घातक पूर 2030 पर्यंत बऱ्याच प्रमाणात वाढतील.
हे पूर वर्षातून एक-दोन वेळा नव्हे तर प्रत्येक महिन्यात येतील. कारण जेव्हा चंद्राच्या कक्षेत अगदी किंचितसा बदल होईल, त्यावेळी येणारा पूर अत्यंत नुकसानदायक असेल. समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशात महिन्यातून दोन ते तीन वेळा असा पूर येईल. नासाच्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जसजशी चंद्राची स्थिती बदलत जाईल, तसतसे हे हानिकारक पूर समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांसाठी अधिकाधिक धोकादायक ठरतील.
– रंजना मिश्रा