मुंबई – इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएल संपल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीतून भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. मात्र, रोहित शर्मा भारतीय संघाबरोबर न जाता तो मुंबईत दाखल होणार आहे.
आपल्या कुटुंबयीांसमवेत रोहित यावेळी दिवाळी साजरी करणार असल्याचेही समजत आहे. त्यानंतर रोहित हा बंगळुरूला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाणार आहे. तिथे गेल्यावर रोहितला तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागणार आहे. या चाचणीत रोहित जर पास झाला तरच त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता येणार आहे.
भारतीय संघ नोव्हेंबरला सकाळी ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर त्यांची याच दिवशी करोना चाचणी करण्यात येणार आहे. या करोना चाचणीचे अहवाल तत्काळ भारतीय संघाला मिळू शकतात. या करोना चाचणीमध्ये जे खेळाडू निगेटिव्ह सापडतील त्यांना 13 नोव्हेंबरपासून सराव करता येणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर भारतीय संघ दुसऱ्याच दिवशी सराव करू शकतो, असे बीसीसीआयमधील सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे.