मुंबई – दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा पराभव झाल. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय झाला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताची गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आणि सहज विजय मिळवला, आणि ही मालिका बरोबरीत सोडवली. या मालिकेमध्ये सलामीवीर रोहित शर्माने सगळ्यांची निराशा केली. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. मात्र, भारतीय संघाचा आघाडीचा माजी गोलंदाज जहीर खानने रोहितची पाठराखण केली आहे.
जहीर खानला एका मुलाखतीमध्ये निवड समितीने कसोटी संघात रोहित शर्माला आणखी किती वेळा संधी दिली पाहिजे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की “रोहितला संधी किती द्यायची याचे उत्तर वेळच ठरवेल. आता जो निवड समितीने त्याला दक्षिण-आफ्रिकेच्या विरूद्ध कसोटी सामन्यता खेळवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे. त्याला तुम्ही कसोटी संघातून बाहेर ठेवूच शकत नाही. रोहितसारखा ‘इन-फॉर्म’ खेळाडू कसोटी संघात असणे हे त्याच्या स्वत:साठी आणि टीम इंडियासाठी, दोघांसाठीही लाभदायक आहे”.
दरम्यान, जहीर पुढे बोलताना म्हणाला की ‘जेव्हा तुम्ही १५ खेळाडूंच्या चमूत रोहितला निवडता, तेव्हा त्याला अंतिम ११ मध्ये संधी दिली जायलाच हवी’, असेही त्याने नमूद केले.