मॅंचेस्टर : भारत आणि पाकिस्तान या हायवोल्टेज सामन्याला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद याने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
दरम्यान, रोहित आणि केएल राहुलनं संयमी सुरुवात केली आहे. रोहित शर्माने 34 चेंडूत आपलं अर्धशतक साजर केलं आहे. यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.
FIFTY!
Here comes the half-century for @ImRo45 off 34 deliveries. His 3rd in the tournament so far.#CWC19 pic.twitter.com/euCtyDGJa5
— BCCI (@BCCI) June 16, 2019
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 14 षटकांत बिनबाद 83 धावा झालेल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर रोहित शर्मा 40 चेंडूत 51 तर के.एल. राहुल 43 चेंडूत 30 धावांवर खेळत आहेत.