India vs New Zealand – भारतीय संघ सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. भारताने २०२३ या वर्षाची सुरुवात अत्यंत दमदार अशी केली आहे. अगोदर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्याची टी-२० मालिका २-१ने जिंकली. त्यानंतर आता सुरु असलेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. टीम इंडिया या मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळाच्या आहेत. या मालिकांसाठी बीसीसीआयने शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवड करण्यात आलेले संघ पाहता भारतीय क्रिकेट चाहत्यांना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूने खळबळ; झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा तर टी-२० मालिकेसाठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे या टी-२० मालिकेसाठी भारताचे वरिष्ठ आणि स्टार खेळाडू रोहित आणि विराट यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेसाठी या दोन्ही खेळाडूंना संघातून वगळण्यात आले होते. त्याचबरोबर केएल राहुल यालाही वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने नेमकं ठरवलंय काय? असा सवाल क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झालाय.
टी-२० क्रिकेटमध्ये वरिष्ठ खेळाडूंऐवजी आता युवा खेळाडूंना जास्त संधी दिली जाईल, असे बीसीसीआयकडून यापूर्वीही सांगण्यात आलेले आहे. मात्र, संघातील वरिष्ठ खेळाडूंना एकदमच बाहेरचा रस्ता दाखवणे हे घातकही ठरू शकते. तर दुसरीकडे एकदिवसीय विश्वचषकाची तयारी म्हणून रोहित, विराट आणि राहुल यांना टी-२० क्रिकेट न खेळवता एकदिवससीय आणि कसोटीमध्ये खेळवले जाईल, असे बीसीसीआयने ठरवले असल्याचे दिसत आहे.
पृथ्वीचे दीड वर्षानंतर पुनरागमन
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे, युवा खेळाडू पृथ्वी शॉचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याने जुलै २०२१ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर पृथ्वीने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, मात्र तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तेव्हापासून तो भारताच्या टी-२० संघात परतलाच नाही. दरम्यानच्या काळात पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दामदार कामगिरी केलेली आहे. अलीकडेच त्याने आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात ३७९ धावा करून मोठा विक्रम मोडीत काढला.
भारताचा टी-२० संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, शिवम मलिक, युवराज मलिक, मुकेश कुमार.